Home सोलापूर सीमा नदीवरील पुलाचे भूमिपूजन, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या...

सीमा नदीवरील पुलाचे भूमिपूजन, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240120_075736.jpg

सीमा नदीवरील पुलाचे भूमिपूजन, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर जिल्हा ब्युरो चीफ ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

उंदरगाव ते चव्हाणवाडी येथील सीना नदीवरील पुलाचे काम संबंधित कंत्राटदारांनी 11 महिन्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण करावे.सदर पुलाचा लोकार्पण सोहळा मार्च 2025 मध्ये होईल या दृष्टीने आवश्यक यात्रिक सामग्री व ज्यादा मनुष्यबळाचा वापर करून वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. उंदरगाव ते चव्हाणवाडी रस्ता क्रमांक 71 वर सीना नदीवरील फुलाचे भूमिपूजन व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.सावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा शिवाजी सावंत, तहसीलदार विनोद रणवरे,गटविकास अधिकारी मन्या सुर्वे, कार्यकारी अभियंता हेमंत चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, सुहास माने यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ.सावत म्हणाले उंदरगाव ते चव्हाणवाडी येथील सीना नदीवरील पुलामुळे संबंधित गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. माढा तालुक्यातील वाकाव गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेतजमीन ही नदीपलीकडे असल्याने त्यांना शेती करण्यासाठी पर्यायी व लांब पल्ल्याच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे. या पुलामुळे त्यांचा वेळ व अंतर वाचणार आहे. त्याच बरोबर पशुवैद्यकीय दवाखाना(
श्रेणी-1 नूतन इमारतीत पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध होणार आहेत राज्यात आरोग्य सेवेचे अत्याधुनिकीकरण करताना प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सुदृष्ट व वैचारिक दृष्ट्या चांगले हवे यासाठी मोफत उपचार सुरू केले.
राज्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यात आत्ता तीन ते चार पट ओपीडी वाढल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्याच बरोबर राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सुरक्षित व सनदृष्ट राहावे ही शासनाची जबाबदारी आहे. यासाठी राईट टू हेल्थ हा नवीन फायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्य विभागामार्फत आषाढी व कार्तिक वारीत महायोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना व भाविकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात तसेच जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध केल्याने सोलापूर आरोग्य विभाग राज्यात सर्वप्रथम असल्याचे डाॅ. सावंत यावेळी सांगितले. सोलापूर आरोग्य विभाग राज्यात सर्वप्रथम आल्याने शिल्प चिकित्सक डाॅ. सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांचा
आरोग्य मंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here