आशाताई बच्छाव
पोलिसाच्या खुनातील आरोपीना फाशी व्हावी – 22 रोजी चाळीसगाव येथे आक्रोश मोर्चा व रास्ता रोको
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- मुंबई पोलीस असलेल्या व चाळीसगाव येथील रहिवासी शुभम आगोणे या तरुणाचा दि 14 जानेवारी रोजी क्रिकेटच्या करणावरून बामोशी बाबा दर्गाजवळ खून झाला होता.
सदर केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, खुनातील आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी, केस चालविण्यासाठी सक्षम सरकारी वकिल नेमण्यात यावा, आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी यामागणी साठी सकल धनगर समाज आणि शुभम आगोणे मित्र परिवाराच्या वतीने
दि 22 जानेवारी रोजी चाळीसगाव येथे अहिल्यादेवी चौकापासून ते शिवाजी महाराज चौक (सिग्लन पाँईट) पर्यंत आक्रोश मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.
दि 17 रोजी धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की चाळीसगांव येथील सराईत गुन्हेगारांनी हत्या करून काही आरोपी घटानास्थळीच सापडले
व इतर आरोपी पळून गेले. मयत शुभम याची हत्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यासाठी व भर दिवसा भर रस्त्यावर पोलिसांचीच हत्या झालेल्या परिवाराला न्याय देण्यासाठी व पोलिसांचे संरक्षण करण्याण्यासाठी जनतेला रस्त्यावर येणे गरजेचे आहे.
निवेदनावर ऍड कैलास आगोणे, धर्मराज बच्छे, राघो आगोणे, शिवाजी देवकर, अमोल चौधरी, राहुल खरटमल, मुकेश राणा, आदित्य बोराडे, महादू आगोणे, अक्षय आगोणे, चेतन देवकर, नानू जाणे, कल्पेश राणा, समर्थ बोरसे आदींच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती शहर पोलीस निरीक्षक, डि.वाय.एस.पी. चाळीसगांव, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक जळगांव, जिल्हाधिकारी जळगांव यांना पाठवण्यात आल्या आहेत.