आशाताई बच्छाव
खा. रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा निवडून दिल्यास जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास-सुभाष देविदान
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): भारतामध्ये प्रत्येक जागी आपला लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असे सर्वांचे मनोगत असते, परंतु आपल्या जालना जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी ना. रावसाहेब पाटील दानवे यांनी दिवसेंदिवस वरचढ काम केले आणि करत आहेत आणि जनतेला श्वासवती देत आहेत, की निधी अभावी कधीही कामे रडखणार नाहीत, इतके दमदार- हिंमतवाले लोकप्रतिनिधी आपल्याला त्यांच्या रुपाने लाभले आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे की त्यांंना आपण बिनविरोध निवडून द्यावे. ड्रायपोर्टचे रूपांतर मल्टीमॉडेल लॉजिस्ट्कि पार्क मध्ये करण्यात आले आहे. आय सीटी महाविद्यालयासाठी त्यांंनी तब्बल 250 कोटी निधी आणला आहे. जालना हे ऐकमेव शहर आहे की, ज्याला सिमेंट काँक्रिटचा (रिंग रोड) बायपास लाभला आहे. संभाजीनगरमध्ये सिमेंट काँक्रिटचा रिंग रोड नाही. पण आपल्या जालन्यामध्ये ना.दानवे यांच्यामुळे सर्व शक्य झाले आहे. ना. दानवे हे पाहिले मंत्री आहे की ते जनतेला आवाहन करतात की तुम्ही काम सांगा निधी आणण्याचे काम मी करतो असे तेे सांगतात आणि त्यांनी आजपर्यंत त्यांचा शब्द पाळला आहे. भारतामध्ये 56 इंच छातीचे दोनच व्यक्ती दिसू लागले एक मोदी आणि दुसरे रावसाहेब दानवे!
रावसाहेब दानवे यांच्यामुळे जालन्याला काय नाही मिळाले!
रावसाहेब दानवे यांच्यामुळे जालन्याला काय नाही मिळाले. जवळपास सर्व काही मिळाले असून अजूनही जनता त्यांच्याकडून आशावादी आहे. म्हणूनच ते बिनविरोध निवडून यायला हवेत. भाजपाच्या सत्तेच्या काळातच त्यांनी केंद्रीय ंमंत्रीपदाचा त्याग करुन राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळे. त्यांच्यामुळेच जालन्याला केंद्रात सत्ता मिळाली. लोक पक्ष पाहात नाहीत. तर काम पाहतात.