आशाताई बच्छाव
शेवली येथील निराधार वृध्द महिलेस बेघर करून
तिसऱ्या व्यक्तीने सुरू केले घरकुलाचे काम
26 जानेवारीला महिलेने आंदोलन करण्याचा दिला ईशारा
ः शेवली येथील निराधार वृध्द महिलेच्या मालकीच्या जाग्याचे बनावट दस्तावेज तयार करून जिवे मारण्याची धमकी देत त्या जागेवर घरकुल बांधकाम करणाऱ्या लोकाविरूध्द कारवाई करून आपली जागा आपल्याला मिळावी अशी आर्तहाक जालना तालुक्यातील शेवली येथील सुगरनबाई उत्तम सिल्लोडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली.
जालना तालुक्यातील शेवली येथील सुगरनबाई उत्तम सिल्लोडे या निराधार वृध्द महिलेने बालचंद्र कचरू सुकटे यांच्याकडून शेवली ग्रामपंचायत अंतर्गत असलेले प्लॉट नंबर 425 त्याची रूंदी 35 आणि लांबी 50 अशी असून हा प्लॉट सुगरनबाईने 1 लाख 35 हजार रूपयांमध्ये खरेदी केली होती. व त्याठिकाणी सुगरनबाई ही निराधार महिला पत्राचे शेडमध्ये वास्तव्यास होती. मात्र, काही दिवसांपुर्वी सदरील महिलेचे घर गावातल्या लोकांनी जमिनदोस्त करून त्याठिकाणी अनाधिकृतपणे बियरबार सुरू केला होता. मात्र, महिलेने सहा दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासनाकडून सदरील बियरबार सिल करण्यात आला. मात्र, तद्नंतर तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी गावातील काही धनाडया लोकांशी आर्थीक व्यवहार करून सुगरनबाई सिल्लोडे या निराधार महिलेस कोणीही वारसदार नसल्याची संधी साधुन या महिलेस बेघर करत या महिलेच्या जाग्यावर तिसऱ्याच व्यक्तीने घरकुल मंजुर करून घेतले आणि त्याचे काम ही सुरू केले. वृध्दमहिलेच्या जाग्यावरील अतिक्रमण हटवावे यासाठी सदरील वृध्द महिला गेल्या काही वर्षापासून सेवली ते जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, पंचायत समिती यांच्याकडे न्याय मागण्यासाठी खेटया मारत आहे. मात्र, या महिलेच्या अर्जाची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही.






