Home जळगाव पाणी सोडण्याच्या कारणातून सरपंचाला शिवीगाळ… दोघांवर अट्रॅसिटी…

पाणी सोडण्याच्या कारणातून सरपंचाला शिवीगाळ… दोघांवर अट्रॅसिटी…

132
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231012-064048_Google.jpg

पाणी सोडण्याच्या कारणातून सरपंचाला शिवीगाळ…
दोघांवर अट्रॅसिटी…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला सरपंचाने गावात पाणी सोडण्यास सांगितले असता या कर्मचाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना शहराला लागून असलेल्या खडकी बुद्रूक येथे घडली. याप्रकरणी संशयित पाणी पुरवठा कर्मचाऱ्यासह दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अॅट्रासिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सरपंच सचिन गुलाब पवार यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित तुषार तांबे हा खडकी ग्रामपंचायत मार्फत गावाला पाणी सोडण्याचे काम करतो.गावास पाणी सोडले नसल्याने त्यास पाणी सोडण्यास सांगितले. त्यास ग्रामपंचायतीमार्फत पाणी सोडण्याच्या कामावर घेण्याच्या कारणावरून तुषार याने आपणास(सरपंच सचिन गुलाब पवार)जातीवाचक शिवीगाळ केली.यावेळी पवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करू नको असे म्हणाले असता तांबे याने तुला जे करायचे ते कर,मी कुणाला घाबरत नाही असा दम देत जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना मंगळवार दि.10 रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास खडकी बायपासवरील सलुनच्या दुकानात समोर घडली.तसेच चार महिन्यापूर्वी संशयित सुनील तांबे यानेही सरपंच पवार यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमान केला होता.
याप्रकरणी सरपंच सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तुषार तांबे व सुनील तांबे या दोघांच्या विरोधात अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989चे कलम 3(1)(आर)(एस),भादंवि कलम 504,506,510 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख करीत आहेत.

Previous articleपाटण्यात तीन महिन्यात पूल उभारण्याचे आश्वासन…. भाविकांचे जलसमाधी आंदोलन स्थगित..
Next articleमाजी खासदार खुशाल बोपचे पिता-पुत्रांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here