आशाताई बच्छाव
वन विभागात कार्यरत असलेल्या रोजंदारी वन मजुराना तात्काळ कायम करण्याची मागणी नाशिक,(ब्युरो चीफ दिलीप चव्हाण)- वनविभागात कार्यरत असलेल्या रोजंदारी वन मजूरांना तात्काळ कायम करण्याची मागणी नाशिक जिल्हा वन श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांळुके यांनी केली आहे. याबाबत वेळोवेळी वन मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांना नासिक जिल्हा वन श्रमिक संघा कडून सातत्याने पाठपुरावा पुरावा केला व दिनांक १४ /६/२०२३ रोजी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार करून एक प्रत वनमंत्री व मा. उपसभापती झिरवाळ साहेबाना देण्यात आली. व त्यांनी लगेच वनमंत्रिना मीटिंग घेण्यास सांगितली त्यानंतर वन श्रमिक संघाचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने दिनाक१९/७/२०२३ रोजी झिरवाळ साहेबांकडे मीटिंग साठी राजेंद्र सांळुके गेले असता, दिनाक२०/७/२०२३ रोजी वनमंत्री व आवारे तसेच दयाराम आणि स्वतः सांळुके समवेत झिरवाळ साहेबांकडे त्यांच्या दालनात मीटिंग झाली सुधीर भाऊंनी सात दिवसात संघटनेच्या मागणीचा विचार करून लेखी कळवतो असे ठरले मात्र अजून सुधीर भाऊंनी कळवले नसल्यामुळे परत माननीय मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून हा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली आहे आमच्या कामगारांना वीस ते पंचवीस वर्षे सेवा झाली आहे व त्यांचे वय आता ५०-५५ वर्ष आहे म्हणून शासनाने तात्काळ हा निर्णय घ्यावा व आमच्या कामगारांना कायम करावे ही अशी मागणी शेवटी सांळुके यांनी केली आहे.