राजेंद्र पाटील राऊत
संपादकीय अग्रलेख…
सुवर्णा सांळुखेचा टोकडेतही अनोखा कारनामा! भाग- १
वाचकहो,
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी खरोखरच हतबल झालेत की,मालेगांव तालुक्यात सुवर्णा सांळुखे नामक ग्रामसेविकेचा अंदाधुंद कारभाराला कुणीच लगाम लावू शकत नाही हे विशेष!एकंदरीत या तालुक्याची सगळी चाड व न्यायनिती बासनात गुंडाळून ठेवली की काय? अशी शंका आता प्रशासनाबाबत सामान्य नागरिकांना छळू लागली आहे.गाव विकासाची सुत्रे ज्याची हाती द्यायची,त्यानेच गावाचे कोटकल्याण करण्या ऐवजी राखरांगोळी करुन शासनाच्या नियम व अटींना गुंडाळून ठेवायचे हे किती दिवस चालणार? व-हाणे प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या सुवर्णा सांळुखेचा आता टोकडेतही अनोखा कारनामा काल उघडकीस आला.शासकीय सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी (दि.२७ आँगस्ट) रोजी टोकडे गावी बेकायदेशीरपणे ग्रामसभेचे आयोजन करुन,ग्रामसभा अर्ध्यातच सोडून ग्रामसेविका सांळुखे यांनी ग्रामपंचायतीतून पलायन केले.व्वारे प्रशासन! प्रशासनाच्या अकर्तबगारीची लक्तरे व अब्रु पार चव्हाटयावर येऊन ठेपली तरी प्रशासन सुवर्णा सांळुखेची तरफदारी कोणत्या हेतूने करीत आहे.सुवर्णा सांळुखेचा “गाँडफादर” नेमका कोण? की, प्रशासन देखील ठोस व कठोर कार्यवाही करण्यास धजावत नाही यामागील खरे गौडबंगाल काय? सुवर्णा सांळुखेंचा मालेगाव तालुक्यातल्या हाताणे,लेंडाणे,व-हाणे,नगाव,दहिवाळ येथील इतिहास प्रशासनाने तपासला तरी ग्रामसेविका म्हणून निश्चितच त्यांचे नाव सुवर्णक्षरात? नोंद करण्या एवढी नक्कीच त्यांची अकर्तबगारी गाजलेली आहे.टोकडेतील माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा ध्यानध्यान यांनी सुवर्णा सांळुखेवर दप्तर दिरंगाई कायद्याखाली कारवाईची मागणी केलेली आहे.तसे पाहता मालेगाव पं.स.चे गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन सुवर्णा सांळुखेवर तात्काळ तडकाफडकी निलंबित करण्याच्या कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यातच खरे हित असून,दुसऱ्याला वाचविण्यासाठी आपणच अडचणीत येऊ नये म्हणजे झालं.हाच वेंदे साहेबांना सबुरीचा सल्ला!
माणूस एकदा चुकला तर पुढे त्याच्या अंगी शहाणपणा येतो असे म्हटले जाते.पण…येथे तर सुवर्णा सांळुखे स्वतःच्या मनमानी प्रमाणे अगदी हिटलर सुध्दा लाजवेल अशाच पध्दतीने जाणून बुजून चुकांवर चुका करुन “गिनीज बुकात” जागतिक विक्रम नोंदविण्याच्या तयारीत असताना,प्रशासनाने का म्हणून त्यांचे पाप आपल्या माथी मारुन घ्यायचे? व-हाणे प्रकरणातही ग्रामसेविका सांळुखेनी ४ आँक्टोबर २०२१ च्या ग्रामसभेला गणपुर्ती पुर्ण नसतानाही बेकायदेशीर ग्रामसभा घेतली.आणि पदाचा गैरवापर करुन कर्तव्यात कसूर करुन सरपंचाला सुध्दा गोत्यात आणले.अशा ग्रामसेविकेच्या बेताल व स्वछंदी मनमानी कारभाराचा फटका अनेकांना बसलेला असूनही प्रशासनाचे डोळे नेमके कधी उघडणार आहेत.हाच मोलाचा सवाल सामान्य जनातून उपस्थित होत आहे.एव्हढेच!