आशाताई बच्छाव
बाभुळगाव कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी केले ग्रामीण मूल्यांकन
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
येवला तालुक्यातील कोटमगांव येथे कृषि महाविद्यालय बाभुळगाव बी.एससी अॅग्रीच्या चौथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत ग्रामीण मूल्यांकन केले.या प्रसंगी सरपंच सौ.आशाताई कोटमे, उपसरपंच सौ.मनिषा माळी , माजी सरपंच सौ.संध्या कोटमे, ग्रामसेवक गणेश रोकडे, ग्रा.सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी विद्यार्थिनींनी ग्रामीण मूल्यांकन केले तसेच ग्रामस्थांना गाव नकाशा , गतिशीलता नकाशा , महिला पुरूष लोकसंख्येची टक्केवारी, साक्षरतेचे प्रमाण , लागवडीखालील क्षेत्र व व्यावसायिकतेचे प्रमाण याबद्दल माहीती दिली.हे सर्व कृषिदूतांनी विविध रंगांची रांगोळी काढून प्रदर्शित केले .या निमित्ताने धार्मिक स्थळ, विद्यालये, दळणवळण तसेच लोकसंख्या इत्यादींची माहिती सहजतीने मिळू शकते ही माहिती लोकांना रांगोळीच्या कलाप्रदर्शनातून पटवून दिले.यासाठी कृषी विद्यार्थिनी ईश्वरी कदम, धनश्री चोथवे,अंकिता गवांदे, पुजा गायकवाड,राशी बागडे,निकिता जगताप, गायत्री गायगोळ,स्वाती खैरे, प्रतिक्षा गावडे यांनी चांगल्या रीतीने कार्य पार पाडले तसेच यासाठी ग्रामस्थांचे योग्य ते सहकार्य लाभले.