Home अमरावती राज्यात चरित्रहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकावृत्तीचे माणसं बाजारपेठेत.खा. अरविंद सावंत.

राज्यात चरित्रहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकावृत्तीचे माणसं बाजारपेठेत.खा. अरविंद सावंत.

81
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230709-084033_WhatsApp.jpg

राज्यात चरित्रहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकावृत्तीचे माणसं बाजारपेठेत.खा. अरविंद सावंत.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी एन देशमुख
ब्यूरो चिफ रिपोर्टर.
अमरावती.
राजकारणात राजकीय स्वचरित्र असावे लागते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे राज्यातील राजकारण हे चरित्रहीन झाले आहे. विचारांशी बांध बांधिलकी राहिली नाही. सत्तेसाठी विकाऊ वृत्तीचे माणसं बाजारपेठेत असून, परंतु सत्य हे कधीही लपत नाही. अशा राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे असल्याचे मत खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे ९आणी१० जुलै असे दोन दिवसीय विदर्भ दौरा करीत आहेत या दौऱ्यामध्ये ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे संवाद साधणार आहे. अमरावतीमध्ये १० जुलैला संवाद सभा होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी अमरावती मध्ये दाखल झाली होती त्यांनी सर्व स्थळाची पाणी करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सूचना दिले सूचना दिल्या आहेत. तसेच यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, काळ इतका बदलला की माणसांनी माणुसकी विसरली आहे. ज्याने घडविले त्या शिल्पकाराला विसरले, त्या शिल्पकारालाच घेऊन पळायला लागली आहेत. सध्याच्या राजकारणातून माणुसकी हरवली असून सत्व आणि तत्व उरलेले नाही. कालपर्यंत आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. काय झालं हे विचार करीत आहेत. ज्यांच्यामुळे ते उद्धव साहेबांना सोडून गेले असेच त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here