आशाताई बच्छाव
इम्तियाज अत्तार
नाशिक रोड :– नाशिक रोड येथे भरणारा सोमवार बाजार हा महानगरपालिके च्या अधिकृत जागेत न भरता रस्तावर भरतो स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका नाशिक रोड येथील अतिक्रमण विभागात तक्रार हि केली परंतु प्रशासनाला या बाबत काहि हि देणेघेणे नाही असे काहिसा हा प्रकार आहे महानगरपालिके चा अतिक्रमण विभाग हा कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याचे दिसून येत असून या बाजारा ठिकाणी नागरिक रहातात. काहि व्यापारी त्यांचा स्वताःच्या अधिकृत जागेत व्यवसाय करतात अतिक्रमणा मुळे त्यांच्या दुकाना समोर भाजीपाला विक्रेते बसतात या वरुन अनेक वेळा वादविवाद होतात. महात्मा गांधी पुतळा ते घोलप वाडी हा रस्ता खुप वर्दळिचा असून ह्या मार्गावर अनेक रुग्णवाहिका जातात, आणि नाशिक रोड वरुन भगुर, देवळाली कॅम्प व देशाचे सैनिक यांची वहाने या मार्गावरून मार्गक्रमण करतात, इतरांचे तर सोडाच पण स्थानिक नागरिकां पैकि जर एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ही रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही हि बाब महापालिके च्या निदर्शनास आणून दिली तरी हि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आणि जर अतिक्रमणामुळे एखाद्या व्यक्तीला जर आपला जीव गमवावा लागला तर महापालिका प्रशासन याची जबाबदारी घेईल का? हा प्रश्न निर्माण होत आहे ते म्हणतात ना झोपलेल्या मानसाला झोपेतून जागे करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्याला झोपेतुन जागे करण अवघड आहे अशी काहीशी परिस्थिती महापालिका प्रशासनाची झाली आहे आता तरी प्रशासन जागे होईल का हि एक शंका नागरिकांना पडली आहे