Home नाशिक जागृती फाऊंडेशनच्या सतर्कतेमुळे मुलगी पोहचली आपल्या घरी

जागृती फाऊंडेशनच्या सतर्कतेमुळे मुलगी पोहचली आपल्या घरी

366

आशाताई बच्छाव

Screenshot_20230705-200517_WhatsApp.jpg

नाशिक,(अँड विनया नागरे)-दिनांक 4 जुलै सायंकाळी ठीक 8:00 वाजता जागृती फाऊंडेशन नासिक संस्थापिका सौ ललिता ताई रामदास नवघिरे ( सार्वभौम ह्यूमन राईस नाशिक शहर अध्यक्ष ) या घरी जात असताना जत्रा हॉटेल परिसरात एक मुलगी कु.प्रियंका गांगुर्डे ,वय :17 जोर जोरात धावत आणि रडत पळत होती मुलगी अतिशय घाबरलेली असताना ललिता ताईंनी मुलीला थांबवले व तिला विचारले काय झाले त्याच क्षणाला ललिता ताईंनी त्यांचा मुलगा शुभम नवगिरे यांना कॉल करून बोलावले व त्यानंतर प्रशांत शेळके यांना कॉल करून तिथे बोलवले तोपर्यंत ललिता ताईंनी पाण्याची बॉटल घेऊन तिला पाणी पाजले व शांत केले . प्रशांत तिथे पोहचल्यानन्तर तिथे मुलीकडून सर्व हकीकत समजुन घेतली तर सदर मुलगी ही ओझर जवळील दिक्षी या गावची असुन ती 10 वि मध्ये शिकत आहे ती ओझर रोड येथे मैत्रिणी कडे आली असताना घरी परत जाण्यासाठी निघाली असता अज्ञात वाहनातून 3 ते 4 तरुण उतरले आणि त्यातील एक जण तिला गाडीत बसण्याची बळजबरी करत होते त्या प्रसंगावधानातून मुलीने कसा बसा बचाव करत ती घाबरून पळत सुटली होती त्यावेळी ती सौ ललिता नवघिरे यांना दिसली व एक आधार म्हणुन ती त्यांच्या जवळ थांबली सदर मुलीस सौ ललिता नवघिरे श्री प्रशांत शेळके शुभम नवगिरे यांनी आडगाव पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन तिच्याकडे कुणाचाही मोबाईल नंबर नसताना आमदार अनिल अण्णा कदम यांनी दीक्षि येथील सरपंच चौधरीसाहेब यांना कॉल करू तिच्या नातेवाईकांना आडगाव पोलीस स्टेशनला पाठवले या सर्व गोष्टींसाठी पिंपळगाव ची केशव नाना बनकर यांचे देखील सहकार्य लाभले त्याचबरोबर प्रशांत शेळके यांनी दिक्षी येथील एका मित्राला फोन करून तिच्या घरापर्यंत निरोप दिला सर्वांच्या मदतीने सदर मुलीचा भाऊ पोलीस स्टेशन ला येऊन मुलीस रात्री 10:30 मी. सुखरूप परत घरी घेऊन गेला

Previous articleनाशिकरोडला बाजार भरतो भर रस्त्यावर
Next articleसूरजागड वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाच्या निराकरणासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.