आशाताई बच्छाव
कुरुळी | निघोजे, केळगाव, वडगाव घेनंद, मरकळ, सोळू, पिंपळगाव, कोयाळी, खेड तालुका भागात पेरण्या सुरू.
खेड,(प्रतिनिधी मयुर चव्हाण)
गेल्या एका महिन्यापासून रखडलेल्या पावसाने गेल्या चार ते पाच दिवसापासून हजेरी लावली असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, वाल, मूग, व इतर पिकांच्या पेरण्या कूरुळी, निघोजे, केळगाव, वडगाव घेनंद,मरकळ, सोळू, पिंपळगाव, या परिसरात शेतकऱ्यांनी सुरू केले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तरी खेड तालुक्याच्या दृष्टीने हा भाग सुजला व सुफलाम असल्याचा समजते या भागामध्ये भीमा आणि भामा या नदीचा संगम असल्याने पाण्याचा साठा मुबलक आहे त्यामुळे प्रत्येक गावे बागायतदार गाव असे या गावांची ओळख आहे, चाकण परिसरात MIDC चे जाळे मोठे असले तरीही येथील शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेतीच करत आहे.