आशाताई बच्छाव
सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं एक हजार कोटीचं नुकसान : धर्मराज काडादी
युवा मराठा आँनलाईन महादेव घोलप सोलापूर
सोलापूर
सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली आहे. कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे पुढील दोन वर्षे गाळप करता येणार नाही. या पाडकाममुळं साधारण एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मत कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं. धर्मराज काडादी यांनी सोलापुरत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूरला नागरी विमानसेवा सुरु करताना अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी १५ जून रोजी प्रशासनाने पाडली आहे. त्यानंतर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सोलापुरात अतिशय घाणेरडे राजकारण झालं असून, त्याचा बळी चिमणी ठरली आहे असे त्यांनी म्हटले आहे.