आशाताई बच्छाव
अमरावती सह विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्यांना काँक्रेटरी रस्त्यात ठेंगा तर काँक्रीट रस्त्या करिता नागपूरला एक हजार कोटी.डाॅ. सुनील देशमुख यांचा सवाल.
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
विदर्भाच्या विकासाचा नावावर अमरावती शहराचा विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्याची सुरू असलेली घोर अपेक्षा ही अत्यंत वेदनादायी असून आता नव्याने राज्य शासनाने काँक्रीट रस्ते बांधण्याच्या निधीमध्ये नागपूर शहरा करता एक हजार कोटी निधी दिली आहे. राज्य शासनाने अमरावती शहराचा विदर्भातील नऊ जिल्ह्यावर केलेल्या अन्यायाची तर परीसीमा गाठली आहे. गेल्या आठ वर्षात नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पावर तब्बल एक लाख दहा हजार कोटी रुपये पेक्षा जास्त निधीची विविध विकास कामे यादी प्रगतीपथावर आहे असा दावा अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी गुरुवारी जारि केलेल्या एका प्रसिद्ध पत्रकार केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कथा वित्तमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या या रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. गेल्याच महिन्यात हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील तीनशे कोटीच्या पहिल्या टप्प्यातील निधी महानगरपालिका ला अदा करण्यात आल्या चे सुद्धा नमूद केलेले आहे. या रस्त्याच्या सिमेंट करना चा खर्च 1000 कोटीच्या वर गेल्यास यातील काही रस्त्यांचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येईल हे सुद्धा नमूद केले आहे. असे असताना अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील काही मुख्य रस्ते आणि मोठ्या नगरी वस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत मुख्य रस्त्याचे अक्षरशः चाळन झालेली आहे. अमरावती महानगरपालिकेला एक”छदाम”सुद्धा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाकरता देण्यात आलेले नाही. शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा सरकारा सहभागी असलेल्या पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी अमरावती शहरा रस्त्याचा करिता अशा आशयाची मागणी केल्याचे दिसून येत नाही. असे डॉ. सुनील देशमुख यांनी म्हटले आहे.