आशाताई बच्छाव
लखमापूर,(प्रतिनिधी अरुण शिरोळे युवा मराठा न्युज) उस लागवड बाबत धांद्री येथे चेअरमन व संचालक मंडळ आपल्या दारी रावळगाव कारखाण्याचा उपक्रम
मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील साखर कारखाना कसमादे परीसरात उस लागवड श्रेत्र म्हणून बागलाण तालुक्यातील धांद्री हे गाव होते मध्यल्या काळात गिरणा कारखाण्याची झालेली वाताहत व रावळगाव येथील कारखान्याचे मर्यादित श्रेत्र या व उसाला हमी भाव व मधल्या काळात पडलेला दुष्काळ या कारणास्तव गेल्या पंधरा वीस वर्षांपूर्वी उसाचा बालेकिल्ला असलेला कसमादे पट्टा डाळींब लागवडीकडे वळलेला होता परंतु तेल्या सारख्या रोगामुळे डाळींब उद्ध्वस्त झाले कांदा पट्टा म्हणून हा सध्या ओळखला जात असताना परंतु असमानी अवकाळी गारपीट व योग्य भाव मिळत नाही शेतकरी वैतागलेला आहे परंतु आज रावळ गाव साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ यांनी कसमादे परीसरात उस लागवड वाढवावी या साठी संचालक मंडळ आपल्या गावात हा उपक्रम राबवुन पुन्हा उस लागवड करावी व कारखाना व परीसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उसाची लागवड करावी असे आवाहन चेअरमन श्री बबनराव गायकवाड आय टी संचालक श्री विकास म्हात्रे यांनी उस तोड बेणे जनरल मॅनेजर श्री भाकरे साहेब यांनी मार्गदर्शन केलं या चर्चेत श्री गजेंद्र चव्हाण श्री अशोक शेवाळे जिजाऊ चव्हाण सह आदि शेतकरी बांधवानी सहभाग घेतला
प्रस्तावना संचालक इंजि श्री कुंदन चव्हाण यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि अभियंता श्री गुलाब देवरे यांनी परीश्रम घेतले