आशाताई बच्छाव
श्रीक्षेत्र कातरणी येथे उद्या हभप कारभारी भाऊ चिकटगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सांगता—
दैनिक युवा मराठा
निफाड (रामभाऊ आवारे)
नाशिक जिल्ह्यातील नंबर 2 चा अखंड हरिनाम सप्ताह म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्रीक्षेत्र कातरणी तालुका येवला येथील 87 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प कारभारी भाऊ चिकटगावकर यांच्या जीवा- शिवाचे ऐक्य सांगणाऱ्या काल्याचे किर्तनाने होणार असून या कार्यक्रमासाठी कातरणीसह परिसरातील भाविकांनी या ज्ञानामृताचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान हभप विजय कु-हाडे व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ कात्री यांनी केले आहे.
श्री क्षेत्र कातरणी येथे निर्जला एकादशी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारपासून सुरु झालेला नाशिक जिल्ह्यातील क्रमांक दोन चा असलेला सप्ताहाचे ८७ व्या वर्षात पदार्पण , त्यानिमित्ताने दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी ६ ते ८वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत भजन संध्या, दुपारी ४ते ६ वाजेपर्यंत संत जीवन कथा ,सादरकर्ते हभप भागवताचार्य ज्ञानेश्वर माऊली नागरे जालना ,संध्याकाळी ६ते ७वाजता हरीपाठ ,७ ते ९वाजेपर्यंत हरीकिर्तन व दररोजच महाप्रसादाची पंगत चालू आहे. सातही दिवस हरी किर्तंनाला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज महाराज हजेरी लावुन गेले. हभप.एकनाथ म.सदगीर ठाणे, हभप.पोपट म.पाटील कासारखेडा, हभप.अनिल म.बार्शीकर , हभप.भगीरथ म.काळे नाशिक, हभप. सुनील महाराज झांबरे बीडकर , हभप.योगीराज म.गोसावी पैठण यांचे किर्तन झाले आज ,बुधवारी निर्जला एकादशी निमित्त हभप. ज्ञानेश्वर माऊली (छोटे माऊली) आळंदीकर व दिनांक १जुन रोजी गुरूवारी सकाळी ८ते १०वाजेपर्यंत हभप. कारभारी भाऊ चिगटगावकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे,मार्गदर्शक हभप कारभारी भाऊ चिगटगावकर,हभप नवनाथ महाराज नागरे जालणा,तसेच गुणीजन हभप. प्रकाश म.नागरे ,हभप. ज्ञानेश्वर माऊली नागरे जालणा, मृदुंगाचार्य ओमकार म.रायते ,हभप वैभव म.वाकचौरे ,स्वप्नील कुलकर्णी (गुरू) ज्ञानेश्वरी साऊंड वागदर्डी, वाल्मीक पवार हे उपस्थित असतात, सप्ताह निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी व दत्त मंदिराला रंगरंगोटी करुन परीसराची साफसफाई केली, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली या सप्ताह सोहळ्याला कातरणी व परीसरातील सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे तरुण भजनी मंडळी व ग्रामस्थ यांनी आवाहन केले आहे.