आशाताई बच्छाव
महा जनसंपर्क अभियान यशस्वी करा
भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन
गडचिरोली येथे भाजप शहर कार्यकारिणीची बैठक
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-
केंद्रातील मोदी सरकारला 30 मे रोजी 9 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे त्याबद्दल 30 मे ते 30 जून पर्यन्त संपुर्ण महाराष्ट्र राज्यात महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात महा जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वोतोपरी परिश्रम घ्यावे व अभियान यशस्वी करावे तसेच केंद्र व राज्यशासनाच्या जण कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांनी सरल अप व बुथ कमिटीचा आढावा घेतला
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने महा जनसंपर्क अभियानाची महत्वपुर्ण बैठक आज दि 27 मे रोजी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे पार पडली.
या बैठकीला जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, भाजयुमो चे शहर महामंत्री हर्षल गेडाम, भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष राजु शेरकी, दलित आघाडी चे शहराध्यक्ष उराडे सर, श्रीकांत पतरंगे, विलास नैताम, देवाजी लाटकर, भाजपचे शहर उपाध्यक्ष विवेक बैस, संजय मांडवगडे, दत्तू माकोडे, संजय हजारे, पल्लवी बारापात्रे, ज्योती बागडे, सोशल मीडियाचे रोणीत कन्नाके उपस्थित होते.
यावेळी 30 व 31 मे रोजी विशाल रैली चे आयोजन करण्यात आले असून या रैलीला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी संबोधित करणार आहेत तरी सर्व शक्ती केंद्र व बुथ प्रमुखांनी आपआपल्या बुथावर विशाल रैलीचे आयोजन करावे व रैलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच 28 मे रोजीच्या मन की बात कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले.
या बैठकीला सर्व शक्ती केंद्र प्रमुख , बुथ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.