आशाताई बच्छाव
आघात झालेल्या तायडे कुटुंबियांच्या दुःखावर सांत्वनाची फुंकर [ मृत्यु झालेल्या शेतकरी कुटुंबाला तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांची भेट शासकीय मदतीचे दिले आश्वासन ]
स्वप्निल देशमुख ब्यूरो चिफ युवा मराठा न्यूज बुलढाणा
वानखेड :- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील रहिवासी असलेल्या कलाबाई तायडे यांच्या कुटुंबाला तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी दिली भेट व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, याबद्दल माहिती दिली व शासकीय मदत मिळण्याकरिता स्वतः प्रयत्न करणारं असे उदगार काढून कुटुंबाला धीर दिला. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. दुर्दैवाने तालुक्यातील कोणत्या शेतकरी कुटुंबावर अशी वेळ आली तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे 2 लाख रुपयाचे संरक्षक कवच आहे. यासाठी अधिकच्या माहिती साठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय संग्रामपूर येथे संपर्क करण्याचे अहवान बनसोडे यांनी केले.यावेळी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व पत्रकार स्वप्निल देशमुख उपस्थित होते.