Home गडचिरोली प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20221203-WA0055.jpg

प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

रामकृष्णपूर, राममोहनपूर व रवींद्रपुर येथे पाणी पुरवठा योजनेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन

जलजीवन मिशन अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील गावोगावी पाणीपुरवठा योजना सुरू करणार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नातून चामोर्शी तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून जल जीवन मिशन अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील गावोगावी पाणीपुरवठा योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी रामकृष्णपूर राममोहनपुर व रवींद्रपूर येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करताना केले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, रामकृष्णपूर येथील सरपंच सौ रतन मंडल ,माजी सरपंच प्रवीण सेन,सुचिता सरकार,सुप्रिया दास, बंगाली आघाडीचे जिल्हा महामंत्री सुशांत रॉय तालुका महामंत्री भोजराज भगतयुवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रतिक राठी राममोहानपूर चे सरपंच प्रकाश मल्लिक, विमल सेन, यांचे सह ग्रामपंचायतचे सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

चामोर्शी तालुक्यात पाणीपुरवठा योजनांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम धूम धडाक्यात सुरू झालेला असून जलजीवन मिशन अंतर्गत गावागावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करून प्रत्येक घराला पाणी पोहोचविण्याचे काम आपण करणार असल्याचे याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले.

Previous articleस्व. श्री तुळशीदास शंकरराव शिंदे निधन
Next articleभाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहरअध्यक्षपदी अर्चना निंबोळ यांची नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here