आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे; पुणे बेंगलोर हायवे वरती भीषण अपघात: पुणे आणि बेंगलोर हायवे वरती भीषण अपघात घडला. पुणे या ठिकाणी नवले ब्रिज च्या वरती रात्री सुमारे 11 ते 12 च्या दरम्यान एक भीषण अपघात घडला .त्यामध्ये एका टॅंकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचा तो टँकर कमीत कमी 48 गाड्यांचा चुराडा करत कमीत कमी पाचशे मीटर पर्यंत ओडत नेले. त्यामध्ये या अपघातात 50 ते 60 प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एकंदरीतच काय तर हायवे ना वेगाचा फटका बसू लागला आहे .त्यामुळे वाहन नियंत्रणासाठी शासनाने कायदे कठोर करावेत अशी मागणी जनतेकडून होऊ लागली आहे. नवले ब्रिज हा जवळपास अपघाताचा हॉटस्पॉटच ठरत आहे असे दिसते. टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर हा अपघात झाल्यानंतर त्या टँकरचा ड्रायव्हर स्टेरिंग मध्ये अडकलेला दिसून आला. याबाबतची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनीही घेतले आहे. पोलीस प्रशासनाला पुढील चौकशीचे आदेशही दिले आहेत .असे अपघात वारंवार होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.