Home नांदेड महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील करीयर कट्टा ग्रुपच्या 26 विद्यार्थ्यांची नोकर भरती क्षेत्रात...

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील करीयर कट्टा ग्रुपच्या 26 विद्यार्थ्यांची नोकर भरती क्षेत्रात उत्तुंग भरारी

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20221024-WA0098.jpg

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील करीयर कट्टा ग्रुपच्या 26 विद्यार्थ्यांची नोकर भरती क्षेत्रात उत्तुंग भरारी

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित ,
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील ” करीयर कट्टा ” केंद्रा मार्फत दि.19 रोजी विविध क्षेत्रातील गुणवंत व यशवंत झालेल्या महाविद्यालयीन 26 विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. केवळ शिक्षण देऊन न थांबता त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे हे महाविद्यालय आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने , प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विलास गोबाडे , नायब तहसीलदार महेश हांडे तर व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ. ए.एन.गित्ते हे उपस्थित होते . याप्रसंगी कु. रंजिता वल्लेपवाड , कु. दीक्षा गायकवाड , कु.सुप्रिया कांबळे , कु.निकिता सोनकांबळे, निखिल कांबळे, लोकडेश्र्वर कांबळे, कु.सना शेख, कु.निकिता नालापल्ले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . मान्यवरांच्या हस्ते सर्व यशवंत विद्यार्थी व पालकांचे शाल , श्रीफळ , स्मृतिचिन्ह आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आलास .
मान्यवरांच्या भाषणात नायब तहसीलदार महेश हांडे यांनी महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयांतर्गत चालणाऱ्या सर्व विविध उपक्रमांचे तोंड भरून कौतुक करून प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिने आणि करीयर कट्टा टीमचे अभिनंदन केले . विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी जिद्द, वेळेचे नियोजन , मेहनत , योग्य मार्गदर्शन आणि विषयाची नीट नेटकी तयारी करण्यास सांगितले . बदलत्या स्पर्धा परीक्षेनुसार स्वतःला बदलणे गरजेचे आहे . ” स्वतःला बदलून स्वतःला घडवा ” असा मौल्यवान संदेश दिला . पो.निरिक्षक विलास गोबाडे यांनी आपल्या भाषणातून स्वतः कसे घडले याची पार्श्वभूमी सांगत विद्यार्थी हे स्वतः स्वतःचे निर्माते कसे आहेत ? त्यांना स्वतःची जाणीव , ज्ञान आणि कार्यावरील विश्वास कसा असावा लागतो याविषयावर सखोल असे मार्गदर्शन केले .
अध्ययक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिने यांनी
शिक्षण , स्पर्धा परीक्षा आणि उत्तुंग करियरचे ग्रामीण संकुल म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अशी ओळख निर्माण होताना महाविद्यालयाचा प्रशासकीय प्रमुख या नात्याने मनस्वी आनंद वाटत आहे . यशवंताचा गौरव करताना त्यांच्या व परिवाराच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद ज्ञानदानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च कार्य आहे असे मला वाटते . समाजात ज्ञानदानाच्या बरोबर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालय सदैव अग्रेसर आहे आणि भविष्यात देखील अधिक जोमाने कार्य करेल असा आशावाद याक्षणी व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष शेंबाळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. डी.के. आहेर , प्रा.डॉ.विजय वारकड , प्रा.डॉ.मनिषा देशपांडे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.शिवसर्जन टाले यांनी केले . यावेळी सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी , पालक आणि पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.

Previous articleदिवाळी निमित्त शासनाच्या वतीने उंद्री प.दे. येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा किटचे वाटप.
Next articleमा.खा.अशोकजी नेते यांची घोट येथे सांत्वनपर भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here