Home बुलढाणा अनेक वर्षांपासून संग्रामपुर ते धामणगाव मार्गाची दैनीय दुरवस्था मतदार संघातील आमदार खासदार...

अनेक वर्षांपासून संग्रामपुर ते धामणगाव मार्गाची दैनीय दुरवस्था मतदार संघातील आमदार खासदार यांच्यावर नागरिकांचा रोष

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0009.jpg

अनेक वर्षांपासून संग्रामपुर ते धामणगाव मार्गाची दैनीय दुरवस्था

मतदार संघातील आमदार खासदार यांच्यावर नागरिकांचा रोष

युवा मराठा न्युज प्रतिनिधी
रविंद्र शिरस्कार संग्रामपूर

संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव मारोड या गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत दयनीय दुरवस्था अवस्था झालेली आहे हा रस्ता धामणगाव मारोड या संग्रामपूर तालुक्यातील गावांना जोडणारा असून पुढे जामोद जळगाव जा कडे जोडल्या जातो या रस्त्यावरून गावातील असंख्य शाळकरी विद्यार्थी यांना संग्रामपूर येथे नेहमी ये-जा करावी लागते, शेतकऱ्यांना कोणत्याही कामाकरता संग्रामपूरला ये-जा करावी लागते, रस्त्याने जाता येता वयोवृद्ध रुग्णांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो अश्या दैयनिय झालेल्या रस्त्यावर भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही

त्यामुळे या बिकट परिस्थितीत असलेल्या स्त्याचे नवीनीकरण करण्याची करण्याची अत्यंत गरज निर्माण असताना कोणतेही लोक प्रतिनिधी या कडे लक्ष्य देत नाही मतदार संघाचे आमदार-खासदार यांच्यावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. धामणगाव येथील रहिवासी ऍंडव्होकेट. विवेक वानखडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की यापूर्वी धामणगाव या गावामार्फत आम्ही जिल्हा परिषदला दोन-तीन वेळा निवेदने दिलेली आहेत निवेदन देऊन सुद्धा त्या रस्त्याची दुरवस्था तशीच रखडली आहे त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींचे सुद्धा या रस्त्यावर दुर्लक्ष झालेले आहे

त्यामुळे या रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी स्वतः येऊन पहावे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सलाईन वर असलेल्या धामणगाव मारोड या दुरवस्था झालेल्या 4 किलोमीटर रस्त्याला नव संजीवनी देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे

Previous articleटिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन
Next articleजागतीक औषध निर्माण दिना निमित्त गोवंशाच्या आजारावर वसाली येथे समुपदेशन शिबीर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here