आशाताई बच्छाव
अनेक वर्षांपासून संग्रामपुर ते धामणगाव मार्गाची दैनीय दुरवस्था
मतदार संघातील आमदार खासदार यांच्यावर नागरिकांचा रोष
युवा मराठा न्युज प्रतिनिधी
रविंद्र शिरस्कार संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव मारोड या गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत दयनीय दुरवस्था अवस्था झालेली आहे हा रस्ता धामणगाव मारोड या संग्रामपूर तालुक्यातील गावांना जोडणारा असून पुढे जामोद जळगाव जा कडे जोडल्या जातो या रस्त्यावरून गावातील असंख्य शाळकरी विद्यार्थी यांना संग्रामपूर येथे नेहमी ये-जा करावी लागते, शेतकऱ्यांना कोणत्याही कामाकरता संग्रामपूरला ये-जा करावी लागते, रस्त्याने जाता येता वयोवृद्ध रुग्णांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो अश्या दैयनिय झालेल्या रस्त्यावर भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही
त्यामुळे या बिकट परिस्थितीत असलेल्या स्त्याचे नवीनीकरण करण्याची करण्याची अत्यंत गरज निर्माण असताना कोणतेही लोक प्रतिनिधी या कडे लक्ष्य देत नाही मतदार संघाचे आमदार-खासदार यांच्यावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. धामणगाव येथील रहिवासी ऍंडव्होकेट. विवेक वानखडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की यापूर्वी धामणगाव या गावामार्फत आम्ही जिल्हा परिषदला दोन-तीन वेळा निवेदने दिलेली आहेत निवेदन देऊन सुद्धा त्या रस्त्याची दुरवस्था तशीच रखडली आहे त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींचे सुद्धा या रस्त्यावर दुर्लक्ष झालेले आहे
त्यामुळे या रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी स्वतः येऊन पहावे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सलाईन वर असलेल्या धामणगाव मारोड या दुरवस्था झालेल्या 4 किलोमीटर रस्त्याला नव संजीवनी देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे