आशाताई बच्छाव
सर्वत्र झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी शेतकरी वर्गाकडुन मागणी
युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यात विजेच्या गर्जना, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचे खुप नुकसान झाले शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे त्या करीता झालेल्या नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे सर्वे करुन संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील सर्वत्र शेतकरी वर्गाकडुन होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील शिवणी सोनबर्डी, आलेवाडी लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी सालवन, दयालनगर, हडियामाल सोनाळासह वानखेड पातुर्डा संग्रामपूर बहुताश गावात
विजेच्या गर्जना, वादळी वाऱ्यासह १० सप्टेंबर तसेच ११ सप्टेंबर रोजी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कपाशी, मक्का, सोयाबीन पीक पूर्णता जमीन दोस्त झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. याचा इतर पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे महसूल मंडळ विभागाने नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करून शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.