आशाताई बच्छाव
जिल्हाधिकार्यांच्या “सागर दर्शन” निवासस्थानी ’श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा रत्नागिरी,(सुनील धावडे)
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याला जिल्हाधिकरी डॉ. बी. एन. पाटील व पत्नी सौ. स्मिता पाटील यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी गणरायाची छोटेखानी आकर्षक श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी तसेच सर्व जनतेचे आरोग्य सुखसमृद्ध असावे, शेती उद्योगधंदे यामध्ये भरभराट व्हावी, असे साकडे घालतानाच जनतेला सुखी समृद्ध समाधानी ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी गणरायाला साकडे घातले. जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होत असतानाच नुकतेच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध शहरामधून पर्यावरण पूरक असे तलाव करण्यात आले होते. यापुढील गणेश विसर्जनालाही अशाच पद्धतीने पर्यावरणपूरक तलावामध्ये नागरीकांनी गणरायाचे विसर्जन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.