आशाताई बच्छाव
कोरोना काळात ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करण्यासाठी चवे ग्रापंचायतीची ग्रामस्थ व चाकरमानी संवाद सभा संपन्न रत्नागिरी,(सुनील धावडे)
कोरोना काळात येणाऱ्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांना काही नियमांना सामोरे जावे लागले होते. यातून काही जणांमध्ये नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील चवे गावच्या ग्रामपंचायतीने विद्यमान सरपंच दीपक गावणकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी यासाठी सभा आयोजित करून चाकरमान्यांशी संवाद साधला.
गेली 2 वर्ष कोरोना सारख्या आजाराशी संपूर्ण जग लढत होत. या महामारीशी लढत असताना असताना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागत होते. त्यात चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. या कोरोना कालावधीत ग्रामस्थ व चाकरमानी यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. हा राग रुसवा, ग्रामस्थ व चाकरमानी यांच्यातून कायमस्वरुपी दूर व्हावा, ग्रामस्थ व चाकरमानी हौशी आनंदाने राहावेत म्हणून ग्रामपंचायत सरपंच दीपक गावणकर यांनी संवाद साधला.
लोकांना येणाऱ्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवू असा शब्द त्यांनी यावेळी दिला. चाकरमान्यांना त्यांनी आपल्या गावाकडे पण लक्ष ठेवण्याची विनंती केली. ग्रा. प. सदस्य श्रीनिवास जोशी यांनी सुद्धा ग्रामस्थ व चाकरमान्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर चाकरमानी बहुसंख्येने उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे आभार मानले.