आशाताई बच्छाव
पुरामुळे शेतातील पिंक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांने केली आत्महत्या।
मुडझा गावातील सलग दुसरी घटना
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्): वैनगंगेला आलेल्या पुरामुळे शेतातील पिंक नष्ट झाले.त्यामुळे नापिकिच्या चिंतेत सापडलेल्या गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथील एका शेतकऱ्यांने घरालगत असलेल्या अंगनातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवनयाञा संपविली.सदर धक्कादायक घटना 1 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.शेतकरी आत्महत्येची मुडझा गावातील हि दुसरी घटना आहे.
महेंद्र सदाशिव आवडे (35) रा. मुडझा असे मृतकाचे नाव आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.महेंद्र आवडे यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत अधिकृत माहीत प्राप्त झाली नसली तरी त्याने यावर्षी शेतातील पिंक हातुन गेल्याने नैराश्यातुन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पुरर्वि मुडझा गावातील चौधरी नामक शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा पद्रा दिवसातच आवडे या शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचलले. प्रकरनाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अंरविद कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत.