Home बुलढाणा वरवट बकाल येथे ढोलताशे, नाचगाने, फटाक्यांच्या आतिषबासह वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या एकत्रित एकाच...

वरवट बकाल येथे ढोलताशे, नाचगाने, फटाक्यांच्या आतिषबासह वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या एकत्रित एकाच मिरवणुकीत बाप्पाचे आगमन

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0014.jpg

वरवट बकाल येथे ढोलताशे, नाचगाने, फटाक्यांच्या आतिषबासह वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या एकत्रित एकाच मिरवणुकीत बाप्पाचे आगमन

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपूर

मागील दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर गणेश उत्सवामध्ये तल्लीन झालेल्या भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे या दोन वर्षानंतर महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस आनंदात पार पडत आहेत संपूर्ण देशात त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रात पारंपरिक उत्साह गणेश उत्सव या भक्तीमय रसात भाविक चिंब झालेले आहे ! पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचे आगमन यावर्षी उत्साहात पार पडत आहे.१४ विद्या, आणि ६४ कलांगुण असलेला बाप्पाचा हा १० दिवसांचा सोहळा करोना काळात थांबलेला होता आणि तो पुन्हा पहिल्यांदाच पुर्ववत सुरु झालेला आहे त्यामुळे यावर्षी सर्वीकडे गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे, ढोलताशांच्या गजरात बापांचा आगमन मोठ्या जल्लोषात होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील बाजारपेठ तसेच मध्यवर्ती केंद्र बिंदू असलेले वरवट बकाल येथे गणरायाचे काल दिनांक ३१ ऑगेस्ट रोजी मोठया थाटामाटात आगमन पाहायला मिळाले आहे. त्यामध्ये गावातील सार्वजनिक गणेश मंडळ यांनी गावातील काही सप्तशृंगी गणेश मंडळ तसेच नवयुवक गणेश मंडळ या सर्व मंडळांच्या बाप्पाच्या वेगवेगळ्या ट्रॅक्टर मधुन एकत्रित घेऊन जल्लोषात मिरवणूक काढली त्यामध्ये ढोलताशे,फटाक्यांची आतिषबाजी सार्वजनिक नाचगान्याणसह बस स्टॅंड वरून गावातील वेगवेगळ्या मंडळातील बाप्पाच्या निवासस्थाना पर्यंत बाप्पा च्या गर्जना केल्या आणि बाप्पांचे आगमन झाले आहे.
यावेळी बुलढाणा वरून आलेल्या स्ट्रायकिंग फोर्स पोलीस पथक तसेच स्थानिक पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

Previous articleगोदावरी एक्सप्रेस मध्य गणरायाचे आगमन             
Next articleराज ठाकरे- शिंदे सरकार यांच्यामध्ये काय शिजतंय!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here