आशाताई बच्छाव
चवे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवास जोशी यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी तालुक्यातील चवे गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवास जोशी यांची निवड करण्यात आली आहे. चवे गावात शांतता निर्माण करण्यासाठी जोशी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. लोकांना योग्य प्रकारे न्याय देण्याचे काम त्यांनी केलं आहे. याच कामाची परतफेड म्हणून चवे गावच्या ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा तंटा मुक्ती अध्यक्षपदाची धुरा सांभाळयला दिली आहे. या निवडीबद्दल श्रीनिवास जोशी यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.