आशाताई बच्छाव
तळवडे धनगरवाडी येथील विहीर अतिवृष्टीत कोसळल्याने ,भर पावसाळ्यात पाणीटंचाई समस्येने ग्रामस्थ त्रस्त रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चिपळूण तालुक्यातील तळवडे – धनगरवाडी येथील नागरीकांना पाणीपुरवठा करणारी एकमेव सार्वजनिक शासकीय विहीर सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीत कोसळली आहे. सदर विहीरीचे बांधकाम 20 वर्षापुर्वी करण्यात आले होते.
तळवडे धनगरवाडीला पाणीपुरवठा करणारी एकमेव असलेली विहीर कोसळल्याने भर पावसाळ्यात वाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागत आहे. लवकरच या विहिरीची पुर्नबांधणी करून शासनाकडून मिळावी अशी तळवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थांची आग्रहाची मांगणी आहे. विहिरीची तातडीने पुर्नबांधणी न झाल्यास येणाऱ्या उन्हाळ्यात येथील जनजीवन पुर्णपणे उध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
विहीर कोसळण्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत तळवडे येथील पदाधिका-यांना कळविण्यात आली आहे परंतु आज तारखेपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी व पदाधिकारी तळवडे धनगरवाडी येथील पडीक विहिरीची पाहाणी करण्यासाठी आलेला नाही.
अशी माहिती रामचंद्र बाबू आखाड जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाप्रबोधन मंच, रत्नागिरी यांनी दिली आहे