Home रत्नागिरी तळवडे धनगरवाडी येथील विहीर अतिवृष्टीत कोसळल्याने ,भर पावसाळ्यात पाणीटंचाई समस्येने ग्रामस्थ त्रस्त

तळवडे धनगरवाडी येथील विहीर अतिवृष्टीत कोसळल्याने ,भर पावसाळ्यात पाणीटंचाई समस्येने ग्रामस्थ त्रस्त

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0097.jpg

तळवडे धनगरवाडी येथील विहीर अतिवृष्टीत कोसळल्याने ,भर पावसाळ्यात पाणीटंचाई समस्येने ग्रामस्थ त्रस्त                                                     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चिपळूण तालुक्यातील तळवडे – धनगरवाडी येथील नागरीकांना पाणीपुरवठा करणारी एकमेव सार्वजनिक शासकीय विहीर सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीत कोसळली आहे. सदर विहीरीचे बांधकाम 20 वर्षापुर्वी करण्यात आले होते.

तळवडे धनगरवाडीला पाणीपुरवठा करणारी एकमेव असलेली विहीर कोसळल्याने भर पावसाळ्यात वाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागत आहे. लवकरच या विहिरीची पुर्नबांधणी करून शासनाकडून मिळावी अशी तळवडे धनगरवाडी येथील ग्रामस्थांची आग्रहाची मांगणी आहे. विहिरीची तातडीने पुर्नबांधणी न झाल्यास येणाऱ्या उन्हाळ्यात येथील जनजीवन पुर्णपणे उध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

विहीर कोसळण्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत तळवडे येथील पदाधिका-यांना कळविण्यात आली आहे परंतु आज तारखेपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी व पदाधिकारी तळवडे धनगरवाडी येथील पडीक विहिरीची पाहाणी करण्यासाठी आलेला नाही.

अशी माहिती रामचंद्र बाबू आखाड जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाप्रबोधन मंच, रत्नागिरी यांनी दिली आहे

Previous articleमहा ई सेवा केंद अभोणा याच्याकडून चिंचोरे गावात e kyc साठी कॅम्प.
Next articleगणेश उत्सवाच्या काळात डी.जे परवानगी नाही -अप्पर पोलीस निरीक्षक विजय कबाडे.         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here