Home गडचिरोली तीन वेळा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना किमान २ वेळेची नुकसान भरपाई द्या आमदार...

तीन वेळा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना किमान २ वेळेची नुकसान भरपाई द्या आमदार डॉक्टर देवरावजी होळी

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0064.jpg

तीन वेळा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना किमान २ वेळेची नुकसान भरपाई द्या

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

चामोर्शी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- गडचिरोली तालुक्यातील वैनगंगेच्या तिरावरील नुकसानग्रस्त गावातील पिकांची केली पाहणी

नदी काठावरील गावांबाबत भविष्यात होणाऱ्या नुकसानीच्या अंदाज घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता

गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या महापुरामुळे व गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील गावांमधील शेत पिकांची प्रचंड नुकसान झाली असून आत्तापर्यंत तीन वेळा पिकाची प्रचंड नुकसान झालेली आहे त्यामुळे या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना किमान २ वेळेच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पिकांच्या पाहणीच्या प्रसंगी केले

यावेळी त्यांनी चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रैतवारी कुनघाडा रैतवारी,तळोधी ,कुरुड, मार्कंडा, चामोर्शी, घारगाव, वाघोली, गडचिरोली तालुक्यातील दर्शनी, येवली ,दर्शनीमाल , गोविंदपूर, शिवणी डोंगरगाव , गडचिरोली कोडगल विसापूर पारडी इंदाडा, पुलखल, पोर्ला, वसा या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

गोसेखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्यामुळे व मेडिकट्टा धरणात पाणी थांबवून ठेवल्याने तसेच अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये महापूराची परिस्थिती निर्माण होऊन ३ वेळा पिकं वाहून गेली. पिकांमध्ये पाणी ५-५ दिवस थांबून राहिल्याने पिके सडून गेली, दोनदा तीनदा शेतकऱ्यांना पेरणी करावी लागली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंता ग्रस्त झालेला आहे . दरवर्षीच अशीच स्थिती निर्माण होणार असल्याने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांना न्याय् देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणीच्या प्रसंगी केले

Previous articleमानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा डॉ. सौ. चंदा कोडवते
Next articleमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान यांचे कडून पूरग्रस्त भागातील शेतीची पाहणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here