आशाताई बच्छाव
मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा
डॉ. सौ. चंदा कोडवते गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
श्री गुरुदेव योग शिक्षण व समिती गडचिरोली व संत नगाजी महाराज मंदिर शाहू नगर व खुशरंग शेंडे परिवारातर्फे संत नगाजी महाराज मंदिर येथे “गोकुळ अष्टमी” निमित्त आयोजित “सामुदायिक प्रार्थना” प्रसंगी डॉ. चंदाताई कोडवते यांनी विचार मांडले. मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे.आई वडिलांची सेवा केल्याने जीवन सार्थक होते. समाजातील अंधश्रद्धारुपि अज्ञान,अंधकार दूर करण्यासाठी गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा अनेक थोर महतांनी मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे, देव देवळात नाही, तर माणसात आहे,हे सांगितल आहे.त्यांनी समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या शोषितांची सेवा हीच ईश्वर सेवा मानली होती. स्वामी विवेकानंदांनी देखील दीनदुबळ्या समाजाचा उद्धार हे ध्येय समोर ठेवून कार्य केले.
याप्रसंगी मारोतराव ईचोडकर माजी सभापती प. स. गड., सुनिल चडगुलवार से. नि. नायब तहसीलदार, सुखदेव वेठे, नामदेव ईजनकर, नामदेव शेंडे, दिलीप मेश्राम, बाबाराव नक्षिने, मनोज सिंह पवार, ज्ञानेश्वर बांबल, दिगंबर रामटेके, प्रभाकर लांडगे, नगराळे, दिनकर नक्षिने, काशिनाथ दहेलकर, महागु तुराटे, मधुकर विधाते, विजय गिरसावळे, जनार्दन पाल, मनोहर कुदरपवार, रेखा वाटेकर, शालु शेंडे, कल्पना ईजनकर, प्रिती मुक्तावरम, मिरा ताजने, प्रसाद म्हशाखेत्रि, अंजली गायकवाड.अरुण बोडखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आयोजन प्रविण मुक्तावरम जिल्हा प्रचारक, आभार प्रदर्शन खुशरंग शेंडे यांनी केले.