Home नाशिक सरपंच निवडीत शिवसेना शिंदे गटाची बाजी. आमदार सुहास आण्णा कांदे यांचा वरचष्मा

सरपंच निवडीत शिवसेना शिंदे गटाची बाजी. आमदार सुहास आण्णा कांदे यांचा वरचष्मा

7
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0029.jpg

सरपंच निवडीत शिवसेना शिंदे गटाची बाजी.
आमदार सुहास आण्णा कांदे यांचा वरचष्मा
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
आज नांदगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायत सरपंच निवडणूक संपन्न झाली.
काही दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका संपन्न झाल्या होत्या. आज त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्व खाली सहापैकी सर्वाधिक 3 ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा भगवा फडकला असून, दोन ग्रामपंचायत संमिश्र तसेच एक राष्ट्रवादीच्या बाजून कौल गेला आहे.
गेल्या काळात शिवसेनेत उभी फूट पडून शिंदे गटाची निर्मिती झाली आणि आमदार सुहास अण्णा कांदे ही शिंदे गटात सामील झाले त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथा पालथ झालेली असताना देखील नांदगाव मतदार संघात मात्र आमदार सुहास आण्णा कांदे यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले आहे.
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच पुढील प्रमाणे
फुलेनगर सरपंच उषा नामदेव पाटील (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच मीना सुनील माळी,(शिवसेना शिंदे गट)
हिंगणवाडी सरपंच मनीषा विठ्ठल डोळे (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच संभाजी गोपीनाथ बच्छाव. (शिवसेना शिंदे गट)
श्रीरामनगर सरपंच अर्चना सुभाष गायकवाड (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच शुभांगी विजय महाजन. मल्हारवाडी सरपंच सुनंदाबाई बळीराम झेंडे (शिवसेना शिंदे गट), उपसरपंच दीपक तात्याराव खैरनार (राॅ, काँ,),
क्रांतीनगर सरपंच पूनम पोपट जेजुरकर (रा.काँ.), उपसरपंच युवराज डोळे (शिवसेना शिंदे गट), गिरणानगर सरपंच अनिता राहुल पवार, उपसरपंच अनिल म्हसु आहेर दोघेही राॅ, काँग्रेस
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बहुसंख्य ग्रामपंचायत वर भगवा फडकविल्याचा आनंद साजरा करण्यात आला.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नव निर्वाचित सरपंच,उप सरपंच,सदस्य तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचे अभिनंदन केले.

Previous articleमुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ५६ कोटी रुपयाचा निधी आमदार डॉ. तुषार राठोड यांची माहिती
Next articleपिंपरी गिते शिवारातील पिकांवर ताव मारून पिकांची नासाडी करणारी ५० वानरांची टोळी जेरबंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here