आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: समर्थांचे देव चोरीला! जालना जिल्ह्यातील जाम समर्थ हे समर्थांचा मुळगाव या ठिकाणी समर्थांचा जन्म झाला. त्या गावांमध्ये 450 वर्षांपूर्वीच प्राचीन मंदिरामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न व हनुमानाच्या मुर्त्या होत्या. या सर्व मुर्त्या पंचधातुनी बनवलेल्या होत्या. हजारो वर्षाचा इतिहास असलेले हे मंदिर या मंदिरावरती चोरी होणे हे फार गंभीर गोष्ट आहे. या चोरीचा छडा लवकरात लवकर लागावा असं समर्थ गावातील जाम समर्थ गावातील ग्रामस्थांचं म्हणणे आहे .या मंदिरामध्ये स्वतः समर्थ श्रीराम, सीता ,लक्ष्मण, शत्रुघ्न ,हनुमानाचे पूजा करायचे सरकारना या मंदिराला प्रार्थनास्थळ म्हणून ब दर्जा दिला होता. या चोरीचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले. विधानसभेमध्ये माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला .त्यावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सखोल चौकशीचे आदेश ताबडतोब दिले आहेत. लवकरात लवकर या चोरी करणाऱ्यांना अटक करावे असे त्यांना सांगितले आहे. देव्हाऱ्याच्या शेजारीच दानपेटी असून सुद्धा त्या दान पिढीला धक्काहीच्या चोरांनी लावला नाही. त्यांनी फक्त या पंचधातूंच्या मुर्त्याच पळवल्या या पाठीमागचं काय कारण असेल हेही ग्रामस्थांनी शोधण्यासाठी सांगितले आहे .स्वामी समर्थांचे आजोबा ही या मंदिरामध्ये पूजा करायचे त्यामुळे या मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे असे समजले जाते.