Home नाशिक मल्हार हिल कॅम्पसमध्ये दहीहंडी उत्सव साजरा

मल्हार हिल कॅम्पसमध्ये दहीहंडी उत्सव साजरा

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0048.jpg

मल्हार हिल कॅम्पसमध्ये दहीहंडी उत्सव साजरा          पिंगळवाडे,(संदीप गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

भा़क्षी येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलीत मल्हार हिल कँम्पस मधील प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर भाक्षी दहीहंडी उत्सव जल्होषात साजरा करण्यात आला.शाळा विकास अधिकारी सुरेश येवला यांनी राधा – कृष्णाचे पूजन केले. संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे,नंदकिशोर शेवाळे, किरण सोनवणे आधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
मुख्याध्यापक पंकज दात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “समाजातील सबल स्थराने दुर्बलला आपल्या खांद्यावर घेऊन प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणे हाच खरा दहीहंडीचा अर्थ होऊ शकतो “असे मत व्यक्त केले. याप्रसंगी कृष्ण खोड्यांवर नाटिका सादर करण्यात आले तसेच राधा व कृष्णाच्या आयुष्यातील विद्यार्थी हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते.
ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे, भाऊसाहेब ठुभे,पवन नाडेकर,सुजाता पाटील, गोकुळ दातरे, शेखर अहिरे ,हर्षली मोरे, पुनम जाधव, सिंधू पवार, जयश्री देवरे,सुजाता गुंजाळ,वृषाली जाधव,दादाजी माळी, रोहिणी सोनवणे, निर्मला रौंदळ, जागृती नहिरे,सविता जाधव, सविता अहिरे,गायत्री देवरे, सुजाता पाटील ,उषा रौंदळ,तेजस्विनी निकम ,स्नेहल वाघ,स्नेहल शिंदे,किरण मोरे,साहेबराव खैरनार, सजन देवरे, किरण पवार,आबा शिंदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.रेखा आहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर कल्याणी गायकवाड यांनी आभार मानले

Previous articleमुखेड कृषि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
Next articleविश्व हिंदू परिषद स्थापना दिवस & निमित्त श्रीकृष्ण जन्म अष्टमी निमित्त दही हंडी स्पर्धा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here