आशाताई बच्छाव
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे संशोधन करण्याची आवश्यकता
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही विषारी भेसळयुक्त दारूमुळे २०% महिला विधवा गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
विधानसभेत दारूबंदीचा मुद्दा उचलून दारूबंदीचा अभ्यास करणे व त्यावर कठोर उपाय योजना करण्याची केली मागणी
गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले याबाबत योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन
गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणावर दारूचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे. बंदीमुळे येणाऱ्या विषारी ,भेसळ युक्त दारूने २० टक्के महिला विधवा झाल्या आहेत. त्यामुळे या दारूबंदीचे संशोधन होणे आवश्यक असून खुले आम दारू विक्री करणाऱ्यांवर शासनाकडून कारवाई होणार का? असा प्रश्न आमदार डॉ देवराव जी होळी यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उपस्थित केला .
यावेळी बोलताना डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून दारूबंदी आहे. तरी देखील छत्तीसगड ,आंध्र प्रदेश, राज्याच्या तसेच भंडारा गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये दारूची गडचिरोली जिल्ह्यात अवैधपणे विक्री केली जाते. चोरीच्या मार्गाने येणारी ही दारू येणारी ही दारू विषारी व भेसळयुक्त असल्याने यात हजारो पुरुषांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे २५ ते ३५ ते पस्तीस वर्षातील २०% टक्क्याहून अधिक महिला विधवा झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
जिल्ह्यातील सदर परिस्थिती अतिशय गंभीर असून या परिस्थितीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी यावेळी सरकारला विनंती केली की, या संदर्भात तातडीने संशोधन करून जिल्ह्यातील अवैध दारूचे धंदे करणाऱ्यांवर , विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील सर्व बॉर्डर क्षेत्रामधून येणाऱ्या दारूवर रेड केल्या जाईल त्यावर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.