आशाताई बच्छाव
पुणे ,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: नांदेड शहरातील कृष्णूर बंधारा पुन्हा फुटला! नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर बंधारा पुन्हा फुटला तेथील अधिकाऱ्याने याच्या पाठीमागचे कारण असे सांगितले की कृष्णूर बंधारा, खेकडा व साळींदर याने फोडला .पहिल्यांदा बंधारा बांधल्यानंतर तो फुटला त्याची कारण असे सांगितले की खेकड्याने या बंधाऱ्याला पोखरून पोखरून फोडले. त्यानंतर चार वर्षांनी याला पुन्हा निधी मिळाला आणि तो बंधारा बांधण्यात आला. पुन्हा हा बंधारा फुटला नंतर कारण देण्यात आले साळींदर या प्राण्याने हा बांधणारा फोडला. खरे पाहिले तर यांच्या निकृष्ट कामाची खापर या प्राण्यांवरती फोडले जात आहे .कृष्णूर बंधारा हा पाजर तलाव या प्राण्यांना फोडला असं या अधिकाऱ्यांमार्फत सांगितले निकृष्ट कामाचा दर्जा याच्यावरती पडदा टाकण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जातोय. सरकारचे पैसे निव्वळ वाया जात आहेत याचा या ठिकाणी निदर्शनास येत आहे .तेथील नागरिकांनी असे सांगितले की खेकडा व साळींदर हे तलाव फोडू शकत नाहीत या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाऊन हा तलाव कामामध्ये तडजोड करून बांधण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार बांधूनही हा तलाव फुटतोय. कारण हे सर्व भ्रष्ट अधिकारी यांच्यावरती कठोर व्हायला पाहिजे व हा तलाव पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधण्यात आला पाहिजे. कारण त्याच्यावरती पूर्ण गाव व आसपासच्या वाड्या अवलंबून आहेत. याची चौकशी व्हायला पाहिजे असे या नागरिकांचे म्हणणे आहे.