आशाताई बच्छाव
ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे हर घर तिरंगा जनजागृती मोहिमेस सुरुवात.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून शासनाच्या आदेशानुसार सदर मोहिमेअंतर्गत हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असल्याने याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी ग्रामसेवक श्री हळदे साहेब, तलाठी सौ. माने मॅडम, सरपंच, उपसरपंच, दामोदर पाटील दोमाटे, बालासाहेब कदम शिरसीकर, धोंडीबा पाटील भोकरे, राम पाटील सूर्यवंशी, खुशाल पाटील सूर्यवंशी, बाबू पाटील सूर्यवंशी,, रमेश अण्णा अडबलवार, विठ्ठल वडजे, हनमंत मटके,माधव पसारे, शिवाजी भोकरे,अनिल पाटील वडजे, ईश्वर पाटील, मुकिंदा सोनकांबळे, हैदर शेख आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.