आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: सातारा कोयना धरण सध्या धोक्याचे पातळी ओलांडतोय! सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरणाचे सध्या सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. कोयना धरणातून सध्या 2000 हजार १०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोयनाचे सर्व दरवाजे आणखी वर उचलावे लागतील. कोयना धरणामध्ये सध्या ८३.७३ टिएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तो दिवसेंदिवस खूप वेगाने वाढत आहे. या कोयना धरणाचा धोका नुसता सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून सांगली जिल्ह्यालाही याचा खूप मोठा धोका होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्कचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.