Home नाशिक जी.प. प्राथ शाळा भवरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा हरघर तिरंगा...

जी.प. प्राथ शाळा भवरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा हरघर तिरंगा अभियान, भारताची वाढवेल शान.

159

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0081.jpg

जी.प. प्राथ शाळा भवरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
हरघर तिरंगा अभियान, भारताची वाढवेल शान.
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भौरी.(रामनगर) ता. देवळा येथे शालेय व्यवस्थापन समितीची मीटिंग घेऊन हर घर तिरंगा अभियानाविषयी उद्बोधन करून अध्यक्ष श्री. आबाजी सोनवणे ,उपाध्यक्ष- योगेश सोनवणे, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, तिरंगा फडकवू घरोघरी. घरोघरी तिरंगा फडकवू ,शौर्याचे गीत गाऊ अशा विविध प्रकारे घोषणा देऊन गाजत वाजत रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ऑन /ऑफ. चित्रकला, निबंध, रांगोळी, संदेश, पॅरामिड, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, भेट कार्ड बनविले, स्मुर्ती गीते इत्यादी घेण्यात आले.
यानिमित्ताने मुख्याध्यापक मा. कैलास निकम,दिलीप सोनवणे, शिवाजी सोनवणे, रघुनाथ सोनवणे ,सोपान सोनवणे ,जिभाऊ सोनवणे, अंगणवाडी ताई मंगला सोनवणे, चंद्रभागा शेवाळे, हिरूबाई सोनवणे, हिरूबाई शेवाळे, प्रियंका सोनवणे इत्यादी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
शाळेतील उपक्रमशील शिक्षिका- श्रीमती. शीतल पाटील यांनी उत्कृष्टरित्या कार्यक्रमाचे नियोजन केले असून सर्वांच्या सहकार्याने हरघर तिरंगा अभियान उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous articleखालगाव ग्रामपंचायतीतर्फे महिला बचत गटाला पत्रावळीचे मशीन तर शेतकरी गटाला नांगरणी मशीनचे वाटप खालगावात बाईक रॅली ठरली लक्षवेधी
Next articleकोयना धरणाने धोक्याची पातळी ओलांडली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.