आशाताई बच्छाव
मुसळधार पावसाने चांदेराई बाजारपेठ २४ तास पाण्याखाली रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरले व संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता बाजारपेठेत शिरलेले पाणी आज दिनांक 9 ऑगस्टला सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास पाणी बाजारपेठेत होते.
चांदेराई सहित हरचेरी, सोमेश्वर, तोनदे, हातीस या भागात पुराचे पाणी शिरले होते. काल रात्रीपासून विद्युत प्रवाह देखील खंडित झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरचा चिखल दूर करण्यासाठी जरूर ती उपाय योजना करावी व या घटनेचे तात्काळ पंचनामे करून पूरग्रस्तांना तात्काळ शासनाने मदत द्यावी अशी आग्रही मागणी चांदेराई चे माजी सरपंच दादा दळी यांनी केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी या बाजारपेठेत व बाजारपेठे शेजारी लोक वस्तीत जाते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाय योजना न केल्याने दरवर्षी ग्रामस्थांना या परिस्थितीला समोरे जावे लागते असे परखड मत दादा दळी माजी सरपंच चांदेराई यांनी व्यक्त केले आहे.