Home पुणे संचारबंदीमुळे लोककलावंत, नाट्य व चित्रपट कलावंत यांच्यावर येणार उपवसमारीची वेळ

संचारबंदीमुळे लोककलावंत, नाट्य व चित्रपट कलावंत यांच्यावर येणार उपवसमारीची वेळ

135
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 संचारबंदीमुळे लोककलावंत, नाट्य व चित्रपट कलावंत यांच्यावर येणार उपवसमारीची वेळ 🛑
✍️ विशेष बातमी 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

माननीय मुख्यमंत्री यांनी कलावंतांच्या पोटावर मारू नये- बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आज रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवसांची संचारबंदी कायम केली असून या संचारबंदी अंतर्गत विविध क्षेत्रातील कामे पूर्ण बंद केली आहेत. त्यापैकीच कला क्षेत्रात काम करणार्‍या कलावंतांना सुद्धा या पंधरा दिवसाच्या संचारबंदी चा मोठा फटका बसणार आहे, गेल्या मार्च पासून कोविडमुळे आधीच लोककलावंत आर्थिक संकटात सापडला आहे. तर चित्रपट निर्मिती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे तर अनेक वर्षापासून लोककलावंत,व नाट्य चित्रपट क्षेत्रावर ज्या लोकांची पोट आहेत अशा लोकांना कामावर गेल्याशिवाय त्यांच्या घरातली चूल पेटणार नाही अशी स्थिती असताना दर वेळी प्रमाणे प्रत्येक वेळेस संचारबंदीत लोककलावंत, चित्रपट व नाट्यकलावंत यांनाच या लॉक डाऊनचा फटका का सहन करावा लागतो हाच मोठा प्रश्न आहे,कारोना ने मरण नंतर येईल मात्र उपासमारी ने मरण आधी येईल अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे,गेल्या वर्षी सुद्धा लॉक डाउन मध्ये ना आर्थिक मदत झाली ना अन्नधान्याची मदत झाली याहीवर्षी याच पद्धतीने या लोक डॉन मध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन लोककलावंत किंवा कलावंतांसाठी केलं गेलं नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या मुळे ब्रेक द चेन ( लॉकडाऊन ) लावला असून, अनेक क्षेत्राला आपण सूट दिली आहे, तसेच आर्थिक अनुदान व रेशन देऊ केले आहे, मात्र गेल्या मार्च 2020 पासून आपण कलाकार , लोककलावंत , तंत्रज्ञ यांना काहीही मदत केली नाही व आर्थिक पॅकेज दिले गेले नाही. लॉक डाऊन च्या सुरुवातीला प्रयोग, शूटिंग, कार्यक्रम बंद केले तर अनलॉक च्या काळात सर्वात शेवटी शूटिंगला खूप सारे बंधने घालत काम करण्याची परवानगी दिली.

आता ही 15 दिवसाचा लॉक डाऊन लावला आहे ज्यात शूटिंग, लोककलावंताच्या कार्यक्रमांना आणि नाटकाच्या प्रयोगाला बंदी घालण्यात आली आहे, तर कलाकारांनी जगायचे कसे…?. देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्री चा भाग असणारे, राज्यासह देशाला सर्वात जास्त कर देणाऱ्या इंडस्ट्री चा घटक असणारे हे कलाकार ,मग या सर्व स्थरातील कलाकारांवर सतत अन्याय का ..? काय फक्त कलावंत हा घटक कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत आहे का ..? विविध क्षेत्राला या लॉक डाऊन मधून वगळण्यात आले आहे, कलाकारांना गत वर्षी पण शासनाने ना आर्थिक मदत केली ना धान्याचा पुरवठा केला, या वर्षीही तेच चालू आहे..!कलाकारांची हालत सध्या खूप खूप वाईट आहे. कारण मागील वर्षी आणि याही वर्षी सर्व जत्रा,यात्रा, उत्सव, लग्नसराई रद्द झाल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर बरोबर शूटिंग, सिरीयल यावर पण बंदी आल्यामुळे बऱ्याच नवोदित कलाकारांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.तर

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सारखे 45 हजारांच्यावर सभासद संख्या असणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष यांनी यासंदर्भात अद्याप कुठल्या प्रकारची भूमिका का घेतली नाही असा संतप्त सवाल यावेळी बाबासाहेब पाटील यांनी विचारला आहे, लॉक डाऊन च्या काळात कमी युनिट मध्ये कोविड चे नियम पाळत शुटिंग ला परवानगी द्यावी आणि त्याच बरोबर कलाकारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे हि विनंती . बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.⭕

Previous article🛑 कोरोना लसीकरण महोत्सव 🛑
Next articleआपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच, निष्क्रिय समित्या मुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here