Home रत्नागिरी बावनदीला पूर, जनजीवन विस्कळीत

बावनदीला पूर, जनजीवन विस्कळीत

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0036.jpg

बावनदीला पूर, जनजीवन विस्कळीत                       रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

संगमेश्वर तालुक्यातील बावनदीला पूर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कालच बावनदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने पात्र दुथडी भरून वाहत आहे. वांद्री बाजारपेठ येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला होता. कोळंबे परचुरी मार्गावर असलेल्या पुलावरून सकाळी पाणी वहात होते. आता थोडा पावसाचा जोर कमी झाल्याने पुलाच्या खालून पाणी वाहू लागले आहे. मात्र पुरातून वाहत येणारा कचरा या पुलावर साचला आहे. बावनदी वरून येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यात आले आहे. आज मोहरम निमित्त सुट्टी असल्याने अनेक कार्यालय बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळही या मार्गावरून कमी प्रमाणात असेल. मार्गावरील वाहतूक बंद असल्याने बाजारहाट साठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होणार आहे.

सप्तलींगी, तळे कांटे, वांद्री, उक्षी, मानसकोंड, परचुरी, कोळंबे, गावमळा परिसरात पुराचे पाणी नदीकाठच्या भातशेतीत घुसल्याने शेती कुजण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Previous articleजि.प. पू.प्राथ. शाळा चाफे नं 1 शाळेतील मुलांनी बनवल्या तिरंगी राख्या
Next articleमुसळधार पावसाने चांदेराई बाजारपेठ २४ तास पाण्याखाली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here