आशाताई बच्छाव
लांजातील काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागल्याने वाहतूक थांबवली वाहतुकीचे अनेक मार्ग बंद रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिटीश कालीन पुल सकाळी ११ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला आहे. बॅरिकेट्स लावून वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र महामार्गावर वाहने बराच काळ रखडल्याने वाहतुक देवधे- दाभोळे मार्गे कळविण्यात आली आहे. अंजणारीतील मंदिरही पाण्याखाली गेले आहे. लांजा तालुक्यात अनेक वाहतुकीचे मार्ग ठप्प झाले आहेत. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.