आशाताई बच्छाव
तोणदे येथे सांब मंदिरात पाणी भरण्यास सुरुवात आज नाम सप्ताहला सुरुवात रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरून चालणे वा वाहन चालवणेही अवघड होत असून काही फूट अंतरावरील दिसत नसून वाहनांचे दिवे लावूनही उपयोग होत नव्हता. तालुक्यात ठिकठिकाणी पाणी भरले असून अनेक भागांना तलावाचे स्वरूप तर नद्यांना पूर आले आहेत.
आजपासून रत्नागिरी तालुक्यातील तोणदे गावी श्री सांब मंदिरात श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या दुसऱ्या सोमवारी हरी नाम सप्ताह सुरवात होत आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यामुळे नदीच्या महापुराचे पाणी श्री सांब मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून अविस्मरणीय श्री सांब महाराजांना जलाभिषेक घडत आहे.