आशाताई बच्छाव
निताणे येथे शिक्षण परिषद संपन्न.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
दिनांक 6. 8. 22 रोजी महाराष्ट्र शासन , शालेय शिक्षण विभाग , डायस, यांच्या संयुक्त विद्यमाने निताणे येथे जिल्हा परिषद शाळा एकदिवसीय पुष्प दुसरे शिक्षण परिषद संपन्न.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध धोरणात्मक विचार सरणीला अनुसरून या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून प्रवीण वाघ हे होते. माहे ऑगस्ट शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक प्रमोद घरटे यांनी मांडले. या परिषदेचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन म्हणून प्रेमानंद घरटे यांनी केले. तसेच विषयानुसार प्रेमानंद घरटे, योगेश खरे , मनोज पवार यांनी तासिका नुसार अध्ययन व अध्यापन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच तीन ते सहा वयोगटासाठी इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी सफल मार्गदर्शन या परिषदेत देण्यात आले तसेच पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने संबंधित शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच या शिक्षन परिषदेसाठी अंगणवाडी, केंद्र शाळा, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी कठोर मेहनत घेऊन ही शिक्षण परिषद योग्य रीतीने पार पाडले.