आशाताई बच्छाव
वानखेड येथे पुर्ण गावात प्रभात फेरी काढुन राबविले स्वातंत्र्य अमृत महोत्सव जनजागृती अभियान
युवा मराठा न्युज वेब पोर्टल प्रतिनिधी:-रवि शिरस्कार
दिनांक 20 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत हर घर तिरंगा मध्ये वानखेड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, उर्दू शाळा, कन्या शाळा, या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांची संपुर्ण वानखेड गावात प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना हरघर तिरंगा चे नारे देऊन उदभोदीत केले या प्रभात फेरीमध्ये ग्रामविकास अधिकारी के.बी.धनवाडे, वानखेड येथील प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, तसेच या तिन्ही शाळेचे मुख्याध्यापकसह -शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांनी सहभाग घेऊन घर घर तिरंगा-हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमात गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.
संपूर्ण गावातून फेरी काढून विद्यार्थी आपल्या शाळेत परत गेले.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून फेरीची सांगता केली यावेळी ग्रामपंचायत वानखेड ग्रामविकास अधिकारी के.बी.-धनवाडे, सरपंच- श्रीमती रंगभाल, उपसरपंच- राजेश पाखरे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत वानखेड सदस्य– सौ वनिता लोणाग्रे’ पुष्पा आमझरे, सौ.मैनाताई पारिसे, दीपक इंगळे शिवाजी आमझरे,विलास भगत,अनिल भारसाकडे,
लिपिक- शालिग्राम हागे,उपस्थित होते..
प्रभात फेरीमध्ये शिपाई- अशोक मेंहंगे,पाणीपुरवठा कर्मचारी-श्याम खंडेतोड, रवि मेंहंगे,विलास पारिसे,यांनी अथक परिश्रम घेतले.