आशाताई बच्छाव
अखेर चौथ्या दिवशी रस्ता मोकळा करून तामगाव ग्रामस्थांचे उपोषणाची सांगता..!
युवा मराठा न्युज वेब पोर्टल (ता.प्र.:- रवि शिरस्कार संग्रामपूर)
तालुक्यातील तामगाव येथील ग्रामस्थांनी जाण्या येण्यासाठी बंद केलेला रस्ता मोकळा करून द्या, या मागणीसाठी दि.१ /ऑगस्ट२०२२ रोजी संग्रामपूर तहसील कार्यालय समोर तामगाव येथील महिला व पुरुषांनी आमरण उपोषण सुरू केले होते.अखेर आज दि. 4 / ऑगस्ट रोजी चौथ्या दिवशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्याने अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात येवून उपोषणाची सांगता करण्यात आली.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की,संग्रामपूर तालुक्यातील
तामगांव शिवारातील गट नं. 25, 24, 23 मधील जाण्या- येण्याचा वही वाटीचे रस्त्यात लोखंडी अँगल लावून सदर रस्ता बंद करण्यात आल्यामुळे याच रस्त्यावरून अकृषक प्लॉट पडलेले असून गांवातील बऱ्याच नागरिकांनी त्या भागात घरे बांधून राहत आहेत. रस्ता बंद करण्यात आल्यामुळे जाण्या -येण्याचा रस्ताच उपलब्ध राहीला नाही. त्याकरिता
दि.१/ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय समोर तामगाव ग्रामस्थासह महिलांनी आमरण उपोषण सुरू केले होते. सतत तीन दिवस विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते , संबंधित अधिकारी यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न करुनही उपयोग झाला नाही. अखेर आज दि.4/आॕगष्ट रोजी चौथ्या दिवशी ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे सहका-याने सामज्यांची भुमिका घेवून रस्यातील केलेले अतिक्रमण लोखंडी अँगल काढून रस्ता मोकळा करून तामगाव ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य व सचिव यांनी लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यात आले.पत्रात नमूद आहे की, रत्यावरील लोखंडी अँगल दि.3 ऑगस्ट रोजी काढण्यात येऊन जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे ,तरी रस्ता संदर्भात नियमानुसार कायदेशीर प्रकिया पूर्ण होईपर्यंत सदर रस्त्यावर कोणी अडथळा व अतिक्रम केल्यास ग्रा.प.तामगाव वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन खाली रस्ता मोकळा करण्याची प्रकिया पूर्ण करेल असे स्वाक्षरीचे पत्रात नमूद आहे. उपोषण कर्ते यांना पत्र व चहा देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी .ह्यावेळी नायब तहसिलदार व्हि.एस.चव्हाण संग्रामपूर पं.स.चे प्रभारी ,सहा. गटविकास अधिकारी जिवन भिलावेकर,ग्रा.प.सचिव,सरपंच, उपसरपंच, सदस्य तलाठी विनोद भिसे,सह ग्रामस्थ व गावातील राजकीय पदाधिकारी , जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, दयालसिंग चल्हाण,राजेःद्र ससाने नागरिक उपस्थित होते .