आशाताई बच्छाव
वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (WCL.)डब्ल्यू सी एल च्या मुरमार खाणीमध्ये भूमिगत खाणकाम चालूू ठेवण्याकरिता खा.अशोकजी नेते यांची मागणी.
मा.श्री. रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे,कोयला व खनिज भारत सरकार,नई दिल्ली. यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जानेवारी 2003 पासून भूमीगत WCLची मुरमार खाण स्थिर आहे.ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पच्या नियुक्त कोर आणि बंपर झोनच्या बाजूला येते.अगोदर पासूनच या खाणीला पर्यावरण व वनीकरण यांची वैधता प्राप्त आहे.त्यासाठी या खाणीला 2001-2002 मध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे.
संदर्भात भारत सरकारच्या MOEF & CC द्वारे11/09/2019 ही राजपत्र अधिसूचना जारीकेल्यामुळे खंड 4.1 विषय खाणच्या आत आली आहे.
मुरमार भूमिगत खाणमध्ये सुमारे 450 मजुरवर्ग काम करतात. व दरवर्षी सुमारे 80,000/- टन कोळसाचे उत्पादन करते.आतापर्यंत कंपनीने 32 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक केलेली आहे.या खाणीतील कोळसा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ला पाठविला जाते.त्यामुळे मुरमार खाण बंद केल्यास खाणीमध्ये काम करणाऱ्या मजुरावर उपासमारीची पाळी येईल
तसेच वीज उत्पादक निर्मितीला सुद्धा अडचण येऊ शकेल. तसेच मुरमार खाण भूगर्भातील असल्याने पर्यावरणावर व भूपृष्ठभागावर सुद्धा याचा परिणाम होत नाही.त्यामुळे, ईएसझेड च्या तरतुदीच्या कलम 4.1 अंतर्गत विचारात घेतले जावे.करिता मुरमार भूमिगत खाण वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड कोळसा उत्खनन चालू ठेवावे. अशी मागणी खा.अशोकजी नेते यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कदानवेत