Home गडचिरोली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आमदार डॉक्टर देवरावजी...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0033.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक घरी तिरंगा ध्वज फडकवला जावा यासाठी करावे प्रयत्न

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारत स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष पुर्ण होत आहेत या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या या 75 व्या स्वातंत्र्यदिनाला आजादी का अमृत महोत्सव”असे म्हटले आहे. या अमृत महोत्सवानिमित्त मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावर नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. येत्या १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त देशातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे .त्यांच्या या आवाहनाला देशातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून स्वातंत्र्यदिनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील “हर घर तिरंगा” हे अभियान राबवण्यात येत असून त्या दृष्टिकोनातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या १३ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरावर उंच जागी फडकवण्यात यावे यासाठी देशातील विविध संघटनांनी हर घर तिरंगा हे अभियान हाती घेतलेले आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी अधिकाधिक घरापर्यंत पोहोचावे. आपला आजादी का अमृत महोत्सव उत्तमरीत्या साजरा करावा असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

Previous articleतिरखुरा येथे वाचनालय व अभ्यासकेंद्रा चे भूमिपूजन सपंन्न
Next articleघरोघरी तिरंगा अभियानांतर्गत हुतात्मा स्मारक येथे झेंडा विक्री केंद्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here