Home युवा मराठा विशेष महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले;जीवन जगण्यासाठी गृहिणींना करावी लागतेय कसरत

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले;जीवन जगण्यासाठी गृहिणींना करावी लागतेय कसरत

49
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220728-183534_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी संजय वाघमारे. सर्वसामान्यांना महागाईचा फटका; घराघरात लागणारे दैनंदिन वस्तू शेंगदाणा साखर सर्व प्रकारच्या डाळी या सर्वांचे महागाई दर गेल्या वर्षभराच्या तुलनेत खूपच पटीने वाढ झालेली आहे भाजीपाला ही खूप महाग झाला आहे. त्या खरेदीसाठी सामान्यांकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे काटकसरीने सामान खरेदी करतात. या सर्व गोष्टींच्या तुलनेत कामगारांचे वेतन व त्यांची मजुरी काहीच वाढलेली नाही त्यामुळे सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं जीवन विस्कळीत झालेले आहे सर्व जीवनावश्यक वस्तू अशाच प्रकारे वाढत राहिल्या तर जगणं मुश्किल होईल. यावर विचार नक्की व्हायला हवा व या गोरगरिबांचं जगणं सहज शक्य व्हावं यासाठी देश पातळीवरती विचार मंथन नक्कीच व्हायला पाहिजे. महागाईमुळे सामान्यांना सणासुदीचे दिवस साजरे करणे ही फार कठीण झाले आहे. त्यामुळे तो जुना आनंद त्या सामान्यांचा नक्कीच हरवला आहे. त्याला उभारी देण्यासाठी यावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. नाहीतर मजुरी व पगार यामध्ये वाढ केली पाहिजे. लाईट बिल ही खूप पटीने वाढले आहे त्यामुळे घरामध्ये बल लावू का नको याचाही विचार करावा लागतोय हे परिस्थिती खूप असही आहे जगणे कठीण होऊन बसले आहे त्यासाठी मार्ग हा लवकरात लवकर निघेल अशी इच्छा व्यक्त करतो व सरकारला नक्की जाग येईल असेही मनोमन वाटतं. जगणारे जगतात आणि मरणारे मरतात अशी वेळ येईल नको. येत्या वर्षभरात महागाईचे दर नक्कीच खाली येतील असं वाटतं!

Previous articleगडचिरोली शहरात रामनगर वार्डात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
Next articleजिंतूर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here