आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी संजय वाघमारे. सर्वसामान्यांना महागाईचा फटका; घराघरात लागणारे दैनंदिन वस्तू शेंगदाणा साखर सर्व प्रकारच्या डाळी या सर्वांचे महागाई दर गेल्या वर्षभराच्या तुलनेत खूपच पटीने वाढ झालेली आहे भाजीपाला ही खूप महाग झाला आहे. त्या खरेदीसाठी सामान्यांकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे काटकसरीने सामान खरेदी करतात. या सर्व गोष्टींच्या तुलनेत कामगारांचे वेतन व त्यांची मजुरी काहीच वाढलेली नाही त्यामुळे सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं जीवन विस्कळीत झालेले आहे सर्व जीवनावश्यक वस्तू अशाच प्रकारे वाढत राहिल्या तर जगणं मुश्किल होईल. यावर विचार नक्की व्हायला हवा व या गोरगरिबांचं जगणं सहज शक्य व्हावं यासाठी देश पातळीवरती विचार मंथन नक्कीच व्हायला पाहिजे. महागाईमुळे सामान्यांना सणासुदीचे दिवस साजरे करणे ही फार कठीण झाले आहे. त्यामुळे तो जुना आनंद त्या सामान्यांचा नक्कीच हरवला आहे. त्याला उभारी देण्यासाठी यावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. नाहीतर मजुरी व पगार यामध्ये वाढ केली पाहिजे. लाईट बिल ही खूप पटीने वाढले आहे त्यामुळे घरामध्ये बल लावू का नको याचाही विचार करावा लागतोय हे परिस्थिती खूप असही आहे जगणे कठीण होऊन बसले आहे त्यासाठी मार्ग हा लवकरात लवकर निघेल अशी इच्छा व्यक्त करतो व सरकारला नक्की जाग येईल असेही मनोमन वाटतं. जगणारे जगतात आणि मरणारे मरतात अशी वेळ येईल नको. येत्या वर्षभरात महागाईचे दर नक्कीच खाली येतील असं वाटतं!